श्री देवदेवेेश्वराच्या गार्भायाच्या उजव्या बाजूस एक संगमरवरी पाषाणाची अती सुंदर श्री गणपतीची मूर्ती आहे.श्री देवदेवश्वराची स्थापना करण्यात आली तेंव्हा पुण्याहवाचनाचे वेळी आरंभी नेहमीप्रमाणे सुपारी ऐवजी गणपतीची प्रत्यक्ष मूर्ती स्थापन करण्यात येऊन तिला आवाहन करण्यात आले.या गणपतीस “सदरेतील गणपती” असे म्हणतात. मंदिराचे चार टोकांवर चार कळस असून मध्यभागी सर्वात उंच म्हणजे 6 फूट व्यासाचा आणि 7 फूट 2.5 इंच उंचीचा कळस असून या कळसांना सोने चढवून मुलामा देण्यात आला आहे. या मुख्यदेवालयाभोवती भक्कम असा सुमारे आठ फूट उंचीचा दुमजली अष्टकोनी तट आहे.तटाचे आत प्रदक्षिणेच्या वाटेवर श्री सूर्य, श्री गणपती,श्री भवानी व श्री विष्णु या देवतांची चार देवळे अनुक्रमे आग्नेय, नैऋत्य, व्यायव्य आणि र्इशान्य कोर्पयांवर आहेत.ही मंदिरे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी इ.स.1766 मध्ये बांधली. त्यामुळे या देवस्थानास “श्री शिव पंचायतन” असे स्वरूप प्राप्त झाले. या सर्व मूर्ती सुबक असून संगमवर दगडाच्या आहेत.
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी आपल्या मातोश्री श्रीमंत काशीबाईसाहेब यांचा नवस पूर्णकरण्यासाठी पर्वती टेकडीवर श्री देवदेवेश्वराचे भव्य मंदिर बांधले. मंदिरात विधिपूर्वक मिती वैशाख शुध्द पंचमी ,शके 1671, दिनांक 23 एप्रिल 1749 रोजी श्री शिवलिंग व श्री शंकराची मूर्ती यांची स्थापना केली.(श्री शंकराला येथे श्री देवदेवेश्वर असे संबोधिले जाते.) मूर्तीच्या एका मांडीवर श्री पार्वती व दुर्सया मांडीवर श्री बालगणपती बसलेले आहेत.या मूर्ती चांदीचा व सोन्याचा मुलामा दिलेल्या आहेत.या तिन्ही मूर्ती भारतीय धातूकामचे अपूर्व सुंदर नमुने म्हणून निर्देशित करता येतील.
श्रीमंत नानासाहेब पशवे यांनी श्री विष्णु मंदिराचे बांधकाम देवदेवेश्र्वर मंदिराच्या वेळेसच केले आहे. या देवालयाची बांधणी फार प्रशस्त अशी आहे.ती एखादया मोठया खोलीसारखी आहे. देवळाच्या गर्भागारासारखी नाही. श्री विष्णूची स्थापना दि.13 जून 1758 रोजी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली आहे. श्री विष्णूची साडेचार फूट उंचीची अतिभव्य पूर्णाकृती मूर्ती अत्यंत सुंदर आणि देखणी असून प्रथम दर्शनीच छाप पडते.श्री विष्णुच्या अत्यंत देखण्या मूर्तीपैकी ही एक आहे.काजळासारख्या काळ्याशार नेपाळ मधील गंडकी नदीतील शालिग्रााम शिलेची ही मूर्ती आहे. श्री विष्णुची चोवीस नावे संध्येमध्ये उच्चारली जातात.भारतीय मूर्तिशास्त्राने श्री विष्णुच्या चोवीस नामांवर आधारित असे चोवीस मूर्तिविग्राह केले आहेत.भगवान विष्णु आपल्या चार हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म या चार वस्तु कोणत्या क्रमाने धारण करतात त्या क्रमावर हे फरक ठरवून दिलेले आहेत.धारणाचा क्रम उजवीकडील खालचा हात ,वरचा हात नंतर डावीकडील वरचा हात , खालचा हात असा असतो. जेव्हा विष्णू मूर्ती ग-च-शं-प या क्रमाने वस्तू धारण करते तेव्हा ती माधव मूर्ती असते.या मूर्तीचा आयुध क्रम ग-च-शं-प म्हणजेच गदा चक्र शंख पद्य असा आहे.त्यामुळे ही विष्णू मूर्ती माधव मूर्ती आहे. उत्तर पेशवाईतील प्रख्यात सेनापती सरदार हरिपंत बल्लाळ फडके यांचे जेष्ठ चिरंजीव तथा दाजीबा फडके यांची कन्या सौ.राधाबाई यांचा विवाह 16.02.1797 रोजी रावबाजी उर्फ बाजीराव (व्दितीय )पेशवा यांचे बरोबर साजरा झाला. या विवाहाच्या वेळी फडके घराण्याच्या मालकीचा कोथरूड येथील बगीचा आंदण म्हणून देण्यात आला. नुसता बगीचा नको महणून बगीच्या मध्ये श्री मॄत्युंजयेश्र्वर शिवमंदिर बांधण्यात आले. याच वेळी पौड फाटा येथील श्रीदशभूजा गणपती मंदिर व पुणे शहरा बाहेरील मोती बाग सुध्दा आंदण म्हणून दिली. श्रीमंत रावबाजी यांनी मोतीबागेत विश्रामबाग वाडा बांधला.पेशवाईच्या अखेरीस रावबाजी यांनी पर्वती ,सारसबाग ,श्री दशभूजा मॄत्युंजयेश्र्वर या खाजगीतील मंदिरांची व्यवस्था शहरातील पाच प्रतिष्ठित व्यक्तींकडे सोपवली. 1846 मध्ये ही सर्व मंदिरे मिळून श्री देवदेवेश्र्वर संस्थान स्थापन झाले. संदर्भ : ह्म श्री प्र.गो.ओक लिखित पेशवे घराण्याचा इतिहास ) श्री दशभुजा गणपती मंदिराचा गाभारा पूर्वी लहान आणि त्यापुढे पत्र्याचा सभामंडप होता.हे मंदिर कर्वे रस्ता रूंदीत जात असल्याने सन 1984 मध्ये त्या मंदिराचे पुननिर्माण करण्यात आले. पूर्वीच्या श्री दशभुजा मंदिरातील श्री गणपती आणि श्री हनुमान मूर्तीवर असलेली शेंदराची पुटे काढल्या नंतर आतच्या सुबक मूर्ती दिसू लागल्या. श्री हनुमान मूर्तीची स्थापना वेगळे छोटे मंदिर बांधुन त्यात करण्यात आली|
श्री देवदेवेश्र्वर संस्थान पर्वती व कोथरूड पुणे ही पुण्यातील गौरवशाली परंपरा असलेली, सार्वजनिक व धार्मिक संस्था आहे.सुमारे 250 वर्षा पूर्वी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी सदर देवस्थानाची स्थापना केली आहे.या संस्थान अंतर्गत सारसबागेतील श्री सिध्दिाविनायक मंदिर,श्री दशभुजा गणपती मंदिर,श्री मॄत्युंजयेश्र्वर मंदिर,श्री रमणा गणपती मंदिर,श्री काळी जोगेश्र्वरी मंदिर, पुण्यातील पर्वती,या मंदिरांचा तसेच श्रीमंत बाळाजी विश्र्वनाथ पेशवा समाधी सासवड , या स्मृति स्थळांचा समावेश होतो. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी आपल्या मातोश्री श्रीमंत काशीबाईसाहेब यांचा नवस पूर्णकरण्यासाठी पर्वती टेकडीवर इ.स.1749 च्या सुमारास श्री देवदेवेश्वराचे भव्य मंदिर बांधले. तो काळ मराठेशाहीच्या इतीहासातील सुवर्णकाळ म्हणावा लागेल. या वेळी मराठयांचा ध्वज अटकेवर (आता पाकिस्तान) फडकला व मराठी अंमल जवळ जवळ भारतभर पसरला.पुणे हे भारतीय राजकारणाचे केंद्र बनले. थोडक्यात पर्वती हे मराठी साम्राज्याचे स्मारकच म्हणता येईल.